एखादी गोष्ट वारंवार आणि प्रभावीपणे सांगितली की ती जनमानसात  रुजायला वेळ लागत नाहीगोबेल्सच्या या तत्त्वानुसार कोणत्याही धर्मातील दैवतेसंतमहात्मे यांच्याविषयी त्यांच्या निकटवर्तीयांकडून अशाच प्रकारे काही मान्यता रुजवल्या जातातकालांतराने त्या धर्माचा किंवा धर्मपरायणतेचा एक भाग होऊन जातातमहाराष्ट्रातील (सर्वात लोकप्रियप्रसिद्धसंतमहापुरुष यातील कोणतं विशेषण लावायचं ते वाचकांनी ठरवावंशिर्डीचे साईबाबा यांचं प्रस्थ किती मोठं आहे हे आपण सर्वच जाणतोमात्र जे चरित्र वाचून ते प्रस्थापित झालं त्या गोविंद दाभोळकरांनी लिहिलेल्या साईसच्चरित्रातील कथा वाचल्या की साईबाबा काही तरी वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि चरित्रात ते वेगळं दिसतंय हे राहून राहून जाणवतंसाईसच्चरित्रात ज्या कथा येतात त्या सर्व कथांना आध्यात्मिक आणि भक्तीपूर्ण रुप दिलं गेलं आहेयातल्या अनेक कथांचं सहजगत्या वैज्ञानिक विश्लेषण करता येऊ शकतंपण जर असं विश्लेषण झालं तर श्रद्धावानांचा शिर्डीकडे येणारा लोंढा कमी होईलकारण जिथे विज्ञान संपतं तिथे श्रद्धा सुरु होते असं वर्षोन्वर्षे या भक्तांना शिकवलेलं असतंहकीम किंवा वैद्य म्हणून साईबाबांचा चरित्रात उल्लेख असला तरी श्रद्धेच्या माध्यमातून इलाज करणारा डॉक्टर असा त्यांचा लौकिक जाणूनबुजून तयार केला गेला आहे हे पदोपदी पटत राहतंश्रद्धेच्या माध्यमाला मानसोपचारांची देखील इथे संज्ञा वापरलेली नाहीश्रद्धा म्हणजे इश्वराची मर्जी आणि सबुरी म्हणजे ती मर्जी आपल्यावर होईपर्यंत वाट पाहणे याच माध्यमातून भक्तांवर बाबांनी उपचार केलेती मर्जी होत नाही तोपर्यंत `ठेवियले अनंतेतैसेचि रहावे’ हा उपदेश साईबाबांनी केला होता असं पटवून दिलं जातंमनोज कुमारच्या सिनेमात मृत्यूच्या दारात पोहोचलेला मुलगा बाबांच्या हाकेने उठून उभा राहतोतेव्हाच हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरतोबाबा चमत्कारी आहेतत्यांना सगळं काही शक्य आहे या विश्वासापोटी शिर्डी 12 महिने गर्दीने ओसंडून वहात असतेअर्थात त्यामुळेच शिर्डी संस्थानाची तिजोरीही!
साईसच्चरित्रात आलेल्या कथांचं अगदी सहज वैज्ञानिक विश्लेषण करता येऊ शकतं या पुष्टीसाठी `पाण्याने दिवे पेटवलेही सर्वात लोकप्रिय कथा पाहूयासमुद्रामध्ये बोटी उलटून वाहून नेलं जाणारं कूड तेल त्या बोटी सभोवतीच्या समुद्री परिसरावर पसरतंही बाब आपल्याला नवीन नाहीया तवंग उठलेल्या पाण्याचा उपसा करणंसुद्धा फार धोकादायक असतंकारण कोणत्याही ज्वलनशील पदार्थानेकसल्याही घर्षणानी तिथे आग लागू शकतेकूड तेल हे कोणत्याही इंधन तेलाची अगदी प्राथमिक अवस्था (रॉ मटेरियलअसतेसाईबाबा हे निष्णात हकीम होतेशिवाय शिर्डीपासून 90 किमी अंतरावर असलेल्या गोदावरीतून वाहतूक होत होतीशिवाय मुंबई 253 किमीवरया सगळ्याचा साधकबाधक विचार केला तर कूड ऑईल साईबाबांना मिळणं कठीण नव्हतंयाच तेलाने जे पाणी मिश्रीत होतं त्याचाच उपयोग त्यांनी दिवे लावायला केला असावा याची खात्री पटतेफकीराला दिवाळीत दिवे काय करायचे आहेत असा त्यांचा उपहास करुन त्यांना जळाऊ तेल देणं शिर्डीच्या दुकानदारांनी नाकारलं तेव्हा त्यांनी कूड तेलाचं शुद्धीकरण  करताच ते वापरलं म्हणून ते पाणी मिश्रीतच राहीलंअसं या कथेचं विश्लेषण करता येऊ शकतं.


दुसरी एक कथा ही साईबाबांच्या सामाजिक कर्तव्यतत्परतेची आहेमात्र तिच्यात जी काही भक्तीश्रद्धा किंवा अंधश्रद्धा घुसडली आहे त्याला तोड नाही. 1911 च्या दरम्यान शिर्डीमध्ये प्लेगची भयंकर साथ आली होतीसाईबाबांना स्वतला याची लागण झाली होतीपण ते त्यावर इलाज करत होतेमात्र शिर्डीभर पसरलेल्या प्लेगला बाबांनी कसं हद्दपार केलं याची ही कथा आहेती अशीबाबांनी आपल्या पोत्यातील गहू काढले आणि ते (त्यांच्या आजही त्यांच्या मशिदीत द्वारकामाईत ठेवलेल्याजात्यावर दळू लागलेचार बायकांनी त्यांच्याकडून जातं हिसकावून घेतलं आणि त्या स्वत दळू लागल्यामग बाबांनी ते दळलेलं पीठ शिर्डीच्या वेशीवर टाकायला सांगितलंगावकऱयांनी ते पीठ शिर्डीच्या सभोवती एका रेषेत पेरलंआणि काय आश्चर्यशिर्डीतून प्लेग अगदी गायब!! हा खरंच चमत्कार म्हणायला हवाशिवाय या कथेचं केलेलं श्रद्धायुक्त विश्लेषण तर माईंडब्लोईंगपण तूर्तास ते असू द्यासाईबाबांसारखीच आणखी एक व्यक्ती या भारतात होऊन नाही पण येऊन गेलीते होते पॅट्रीक गेडस्एक समाजशास्त्रज्ञपर्यावरणप्रेमी आणि नगररचनाकार. 10 वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात प्राध्यापकी केलीते भारतातील सणउत्सवांकडे पर्यावरण रक्षणात लोकसहभागाच्या दृष्टीकोनातून पहात होतेओडिशाच्या पूरीची जगन्नाथ रथयात्रा ही त्यांच्यासाठी सर्वात अधिक प्रेरक होतीया यात्रेच्या दरम्यान सर्व रस्ते लख्ख असतातशिवाय यात्रेत सर्वात शेवटी चालणारा समूह हा रस्त्यात पडणारी फुलंअबीरगुलाल उचलत पुन्हा नव्याने रस्ते साफ करतातयामुळे रोगराईचं नामोनिशाण नसतंहा प्रयोग त्यांनी 1917 मध्ये इंदौरमध्ये पसरलेल्या प्लेगच्या दरम्यान केलातिथल्या संस्थानिकांना त्यांनी सांगितलं की आपण एक रथयात्रा काढणार असल्याचं जाहिर करामात्र ही यात्रा नेमक्या कोणत्या विभागातून जाईल सांगता येत नाहीअसं सांगितल्यामुळे नागरिकांनी अख्खं इंदौर स्वच्छ केलंउंदीरघुशींचा बंदोबस्त केलाबिळं बुजवलीकचऱयाची योग्य विल्हेवाट लावलीरथयात्रा निघाली एका मार्गावरुन पण त्यानिमित्ताने प्लेग पळालापण त्यामुळे पॅट्रीक गेडस् महात्मा ठरले नाहीत तर उत्तम नगररचनाकार समाजमानसशास्त्रज्ञ ठरलेत्यांची मंदिरं नाही उभारली गेलीतर समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ते प्रेरक ठरले.



साईबाबांच्या बाबतीत हिच गोष्ट घडली नाहीआज गौरी गणपती ते नवरात्र ह्या कालावधीतही रस्ते स्वच्छ नसतातइतर वेळेची गोष्ट  केलेलीच बरीसाईबाबांचा जो आदर्श आपल्याला मिळायला हवा होता नेमका तोच मिळत नाहीत्यांच्या सभोवती असणाऱया दाभोळकरचांदोरकरदीक्षितसाठेखापर्डे या सर्वांनी बाबांना देवाचा दर्जा देऊन भक्तीच्या चाकोरीत बंदिस्त केलंदरदिवशी 25,000 लोक शिर्डीत जमतात पण किती लोकांना समाजशास्त्राम्हणून साईबाबा माहीत आहेत हा संशोधनाचा विषय आहेया लेखाचा उद्देश साईबाबांचं महानत्व सांगण्याचा नाही तर निव्वळ माणूसपण सांगण्याचा आहेकिंबहुना गाडगेमहाराजांना जसं आपण ग्रामस्वच्छतेसाठी आदर्श मानतोतोच स्तर साईबाबांचा असायला हवा होतादेवाचा नाहीया समाजशास्त्राrने लोकांना साधी राहणी शिकवली त्याला सोन्याच्या मुकुटाचे नवस बोलणे हा नक्की कोणाचा चहाटळपणा आहे हे ही सर्व साईभक्तांनी तपासायला पाहिजेबाबांच्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा नेमका काय परिणाम झालाकाहीच नाहीमग हे उगीचचे स्तोम कशासाठीमाणूस मोठा की त्याची कृतीते विष्णूचा अवतार आहेत असा प्रचार करुन मुस्लिमांना उदासिन करण्यामागे भक्ती होती की धर्म-अर्थकारणया सगळ्याचा उहापोह करायला नको कावाढणाऱया गर्दीला जर तात्विक अधिष्ठान नसेल तर ही बौद्धिक गुलामगिरी वाढत जाणार आहेतिला रोखायचं असेल तर पॅट्रीक गेडस्ना आदर्श करासाईबाबांचं देवत्व विसर्जित करात्यांच्या माणूसपणाची प्रतिष्ठापना करा.